गुणरत्न सदावर्ते यांना १४ दिवस न्यायालयीन कोठडी, पुणे पोलीस ताबा घेण्यासाठी कोल्हापुरात

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२५ एप्रिल । पाच दिवसाची पोलीस कोठडी संपल्यानंतर अॅ. गुणरत्न सदावर्ते यांना आज जिल्हा सत्र न्यायालयासमोर उभे करण्यात आले. कोर्टाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे. सदावर्ते यांनी जिल्हा कोर्टात जामिनासाठी अर्ज केला आहे. दरम्यान, सदावर्ते यांचा ताबा घेण्यासाठी पुणे पोलीस कोल्हापुरात दाखल झाले आहेत.

सदावर्ते यांनी मराठा आणि मागास समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करणारी वक्तव्य केल्याबद्दल मराठा समाज समन्वय समितीचे दिलीप पाटील यादी त्यांच्या विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानंतर पोलिसांनी मुंबईतील कोर्टात सदावर्ते यांचा ताबा मिळवण्यासाठी अर्ज केला होता. कोर्टाने कोल्हापूर पोलिसांचा अर्ज मंजूर केला. त्यानंतर पोलीस सदावर्ते यांना पाच दिवसापूर्वी कोल्हापुरात घेऊन आले. सदावर्ते यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना कोर्टात हजर केले असता प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी व्ही. टी. गायकवाड यांनी पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली.

आज सोमवारी पाच दिवसांची पोलीस कोठडी संपली असून त्यानंतर पोलिसांनी सदावर्ते यांना कोर्टात हजर केले. सरकारी वकील आम्रपाली कस्तुरे आणि फिर्यादी दिलीप पाटील यांचे वकील शिवाजीराव राणे यांनी पोलीस कोठडीची मागणी केली. कोर्टाने त्यांची मागणी फेटाळून लावत सदावर्ते यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली. त्यानंतर सदावर्ते यांनी जिल्हा न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहे.

दरम्यान, सदावर्ते यांच्याविरोधात पुणे जिल्ह्यात गुन्हा दाखल झाला असून त्यासाठी ताबा मिळवण्यासाठी पुणे पोलीस कोल्हापुरात दाखल झाले आहेत. कोर्टाने सदावर्ते यांचा जामीन मंजूर झाल्यानंतर त्यांना परत मुंबईतील कारागृहात नेण्यात येणार आहे. त्यानंतर पुणे पोलिसांना सदावर्ते यांचा ताबा मिळू शकतो असे वकिलांचे म्हणणे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *