जम्मू-कश्मीरमध्ये घुसखोरीचा डाव उधळला, 24 तासात सहा दहशतवाद्यांचा खात्मा

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २७ मे । जम्मू-कश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा सफाया सुरू आहे. गेल्या 24 तासांमध्ये सुरक्षा दलाच्या जवानांनी सहा दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. गुरुवारी सकाळी कुपवाडामध्ये घुसखोरीच्या प्रयत्नात असणाऱ्या दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले.

कुपवाडा जिल्ह्यातील जुमागुंड गावामध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये चकमक उडाली. जुमागुंड येथून काही दहशतवादी घुसखोरी करत असल्याची माहिती सुरक्षा दलाच्या जवानांना मिळाली होती. यानंतर सुरक्षा दलाचे पथकं शोधमोहीम करत असताना दहशतवाद्यांनी गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल जवानांनी केलेल्या गोळीबारामध्ये तीन दहशतवाद्यांचा मृत्यू झाला आहे.

तीन दहशतवादी लश्कर-ए-तोएबा या दहशतवादी संघटनेशी संबंधित होते आणि तिघांनाही यमसदनी धाडण्यात आले आहे. त्यांची ओळख पटवली जात असून त्यांच्याकडून शस्त्रांस्त्रांसह आक्षेपार्ह साहित्य आणि दारुगोळा जप्त करण्यात आल्याची माहिती कश्मीर पोलीस झोनचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.

बुधवारी तिघांना कंठस्थान

जम्मू-कश्मीरमधील बारामुल्ला येथे पोलीस आणि सुरक्षा दलांनी केलेल्या संयुक्त कारवाईत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. या चकमकीत जम्मू-कश्मीर पोलिसांचा एक जवानही शहीद झाला आहे. ठार झालेले तीनही दहशतवादी पाकिस्तानचे होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *