पावसाळ्यात पर्यटनाचा आनंद घ्यायचाय या ठिकाणी भेट द्या

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.८ जून । पावसाळ्यात महाराष्ट्रात फिरायची ईच्छा असले तर आम्ही तुम्हाला काही ठिकाणे सांगतो तिथं जाऊन तुम्ही मनमुरादपणे पाऊसाचा आनंद घेऊ शकता. सोबतच तेथील हिरवा शालु पांघरलेल्या निसर्गाच्या वेगवेगळ्या छटा अनुभव शकता. चला तर मग बघु या कोणती सात ठिकाण आहे तिथं पावसाळ्यात जाता येत. (Best Places to Visit in Monsoon)

भंडारदरा –
पावसाळ्यात दोन दिवसांचा ट्रीपकरता जाण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा हे अगदी योग्य ठिकाण आहे. पावसाळा सुरु की इथे काजवा मोहोत्सव भरतो. निसर्ग सौंदर्याने नटलेले हे स्थान, इथले धबधबे, डोंगरकडे, जलाशय, हिरवी झाडे, शुद्ध आणि थंड हवा जागेच्या मूळ सौंदर्यात अजूनच भर टाकतात.

भीमाशंकर –
पुण्यातील जिल्ह्यात असणारे भीमाशंकर हे घनदाट अरण्यानं असलेलं समृध्द ठिकाण आहे. भीमा नदीचा उगमही याच अरण्यातून होतो. हे ठिकाण उंचावर असल्याने पावसाळ्यात अगदी डोळ्याचे पारणे फेडणारे सौंदर्य निसर्गाने इथे उधळलेले असते. येथील गुप्त भीमाशंकर, कोकणकडा, सितारामबाबा आश्रम, नागफणी इ. ठिकाणे पाहण्यासारखी आहेत. फक्त इथं जातांना सोबत आपली छत्री किंवा रेनकोट घेऊन जा. कारण इथे सतत पाऊस पडत असतो.

समुद्र किनारे –
दापोली, दिवेआगर, वेळास हे महाराष्ट्रातील काही निसर्गरम्य, निवांत असणारे, स्वच्छ आणि कमी गर्दी असणारे समुद्रकिनारे आहेत. पावसाळ्यात तुम्ही या ठिकाणांना भेट देऊ शकता. ही तीनही ठिकाणे कोकणात असल्याने या ठिकाणी जायचा रस्तादेखील पावसाळ्यात तितकाच नयनरम्य असतो.

चिखलदरा –
सातपुडा पर्वतरांगेत तब्बल एक हजार मीटर उंचीवर असलेले चिखलदरा विदर्भातील एकमेव थंड हवेचे ठिकाण आहे. खोल दऱ्या, धबधबे, दूरवर पसरलेले हिरवे गालिचे, धुक्याची दुलई असे चित्र इथे पावसाळ्यात पाहायला मिळते. तुम्हाला भटकंतीसाठी देवी पॉईट, पंचबोल पॉईट. वॉटर बोटींग व दुचाकीवरून मस्त फिरण्यासाठी भीम कुंड, वन उद्यान, या परिसरातील लोकांनी तयार केलेल्या वस्तूंचे संग्रहालय ही प्रेक्षणीय ठिकाणे आहेत. येथून जवळच एक किल्ला सुध्दा आहे.

इगतपुरी –
हे ठिकाण समुद्रसपाटीपासून उंच असल्याने इथे वर्षभर थंडगार वातावरण असते. अस म्हणतात की इगतपुरी तालुक्याला निसर्गाने भरभरून दान दिले आहे. भरपूर वनसंपदा आणि जलसंपदा असल्याने निसर्गाचे वेगवेगळे अंग अगदी जवळून अनुभवायला मिळतो. भातसा नदीचे पात्र, आर्थर लेक, कळसुबाई शिखर, अमृतेश्वर मंदिर, धम्मगिरी विपश्यना केंद्र, गिरीसागर फॉल्स, कॅमल व्हॅली, त्रिनगलवाडी फोर्ट, थाल घाट, म्यानमार गेट, भावली डॅम, अशोका फॉल्स, घाटनदेवी माता मंदिर ही ठिकाणे इगतपुरीचे आकर्षण आहेत.

माळशेज घाट –
नगर-कल्याण रस्त्यावरील माळशेज घाट हा मुसळधार पावसात भिजण्यासाठीचे अप्रतिम ठिकाण आहे. अगदी हात उंचावला तर हातात ढग येण्याची शक्यता या घाटात दिसते. या घाटातून दूरवर पसरलेल्या दऱ्यांचा नजरा पाहणे काही औरच. म्हणूनच फोटोग्राफर्स लोकांची ही अतिशय आवडती जागा आहे. माळशेजघाटा आधी मुरबाडजवळ असणारा पळूचा धबधबा हे एक उत्तम स्थळ आहे, जवळच हरिश्चंद्र गडही आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *