IND vs IRE T 20I Series : टीम इंडियाला मिळाला नवा टी 20 कॅप्टन, पहा कोणाला मिळाली संधी?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१६ जून । टीम इंडियाची आयर्लंड विरुद्ध टी 20 मालिका (IND vs IRE T 20I Series) खेळणार आहे. या टी 20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या मालिकेसाठी सूर्यकुमार यादव संजू सॅमसनची एन्ट्री झाली आहे. तर टीम इंडियाला नवा कॅप्टनही मिळाला आहे. आपल्या नेतृत्वात आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सला विजेतेपद मिळवून देणाऱ्या हार्दिक पंड्याला नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. (ind vs ire t20i series hardik pandya become 9th t20i indian captain who will lead team)यासह हार्दिक टीम इंडियाचा टी 20 क्रिकेटमधील नववा कर्णधार ठरला आहे. याआधी 8 जणांनी टीम इंडियाचं टी 20 मध्ये नेतृत्व केलं आहे.

वीरेंद्र सेहवाग टीम इंडियाचा पहिला T20 कॅप्टन होता. सेहवागने 2006 मध्ये टीम इंडियाचे नेतृत्व केलं होतं. सेहवागने केवळ 1 सामन्यातचं भारताचं नेतृत्व केलं. यानंतर एमएस धोनीने 72, सुरेश रैना 3, अजिंक्य रहाणे 2, विराट कोहली 50, रोहित शर्मा 28, शिखर धवन आणि ऋषभ पंत यांनी आतापर्यंत प्रत्येकी 3 टी-20 सामन्यात टीम इंडियाच्या कॅप्टन्सीची जबाबादारी सांभाळली आहे.

हार्दिकला आयपीएलच्या 15 व्या मोसमात नेतृत्वाची संधी मिळाली. त्याने त्या संधीचं पूर्णपणे सोनं केलं. बॉलिंग, बॅटिंग आणि कॅप्टन्सी अशा तिन्ही आघाड्यांवर त्याने यशस्वीरित्या जबाबदारी पार पाडली. इतकंच नाही, तर पहिल्याच मोसमात आपल्या संघाला आयपीएल ट्रॉफी जिंकून दिली. त्यामुळे आता हार्दिक आयर्लंड विरुद्ध कशाप्रकारे नेतृत्व करतो, याकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *