‘नाहीतर लवकरच तुझा आनंद दिघे झाला असता’; केंद्रीय मंत्री नारायण राणे

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२१ जून । विधानपरिषद निवडणुकीनंतर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. शिवसेनेचे मोठे नेते आणि महाविकास आघाडीतील मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 21 आमदार नॉट रिचेबल आहेत. या आमदारांशी शिवसेनेचा संपर्क होऊ शकलेला नाही. त्यामुळे राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीला धोका निर्माण झाला आहे.

दरम्यान, भाजपनेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ट्विट करीत म्हटले की, शाब्बास एकनाथजी योग्य वेळी योग्य निर्णय घेतलास, नाही तर लवकरच तुझा आनंद दिघे झाला असता…

राणेंच्या या ट्विटमुळे पुन्हा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत. आनंद दिघे हे शिवसेनेचे ठाण्यातील मोठे नेते होते. राणे नक्की असे का म्हटले याबाबत सोशलमीडियावर चर्चा सुरू आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *