महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२३ जून । राज्यात कोकण (Kokan), मध्य महाराष्ट्र घाटमाथा, तसेच विदर्भात बहुतांश ठिकाणी पुढील पाच दिवस मुसळधार तर मराठवाड्यात (Marathwada) हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. मान्सूनची आगेकूच होत असली तरी त्याचा वेग मंदावला आहे. राज्यातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी सिंधुदूर्ग या भागात पुढील पाच दिवस मुसळधार; धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नगर, कोल्हापूर सातारा सांगली भागात तुरळक पाऊस होणार आहे. सोलापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड,लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यात मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून मध्य प्रदेश पार करून राजस्थानच्या दिशेने मान्सूनची (Monsoon) वाटचाल सुरु आहे. मात्र त्याचा वेग काहीसा मंदावला आहे.
मुसळधार पाऊस
पालघर
ठाणे
रायगड
रत्नागिरी
सिंधुदुर्ग
तुरळक पाऊस
धुळे
नंदुरबार
जळगाव
नाशिक
नगर
कोल्हापूर
सातारा
सांगली
मेघगर्जना (विजांच्या कडकडाटासह)
सोलापूर
औरंगाबाद
जालना
परभणी
बीड
हिंगोली
नांदेड
लातूर
उस्मानाबाद