महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२३ जून । केंद्रातील मोदी सरकार येत्या 1 जुलैपासून कामगार कायद्यांतर्गत अनेक नवे नियम लागू करण्याच्या तयारीत आहे. त्याचा नोकरीसंबंधी विविध बाबींवर परिणाम होणार आहे. नव्या नियमांचे पालन करणे कंपन्यांना बंधनकारक राहणार आहे. नव्या नियमांनुसार, कामाचे तास 8 तासांवरून 12 तासांपर्यंत वाढणार आहेत. मात्र याचवेळी कंपन्यांना कामगारांना आठवडय़ात तीन सुट्टय़ा द्याव्या लागतील. तसेच मूळ वेतन हे एकूण वेतनाच्या 50 टक्के किंवा त्याहून अधिक असले पाहिजे.
मूळ वेतन वाढल्यामुळे पगारातून पीएफ आणि ग्रॅच्युईटीचे जास्त पैसे कापले जाणार आहेत. त्याचा फायदा सेवानिवृत्तीनंतर मिळणार आहे. निवृत्तीच्या वेळी कामगारांना पीएफ आणि ग्रॅच्युईटीचे अधिक पैसे मिळू शकणार आहेत. नव्या नियमांच्या अंमलबजावणीबाबत सरकारकडून अजून अधिकृत घोषणा केलेली नाही.