महाराष्ट्र २४ ऑनलाईन : मुंबई : मुंबईतील वांद्रे स्थनकाजवळ मंगळवारी परप्रांतीयांची गर्दी जमल्याचा प्रकार घडला होता. यानंतर भाजपाने सरकारवर जोरदार निशाणा साधला होता. तसेच भाजपाच्या समर्थकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी सोशल मीडियावरुन करण्यात येत होती.आता मनसेनेही उद्धव ठाकरेंच्या समर्थनांसाठी मैदानात उतरली आहे.मनसेच्या नेत्या रुपाली पाटील यांनी ट्विट करुन उद्धव ठाकरेंवर टीका करणाऱ्यांना थेट इशारा दिला आहे. रुपाली पाटील म्हणाल्या की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चांगले काम करत आहेत. पण जर महाराष्ट्राच काही वेडवाकड (नुकसान) करण्याचा प्रयत्न केला तर, मुख्यमंत्र्यांच्या भावाचं नाव राज ठाकरे आहे हे लक्षात ठेवा असं रुपाली पाटील यांनी सांगतिले. तसेच राज ठाकरे विनंती करत नाही तर थेट जाळ काढतात असा इशारा देखील रुपाली पाटील यांनी दिला आहे.
मुख्यमंत्री साहेब चांगले काम करत आहेत पण जर महाराष्ट्रच काही वेडवाकड (नुकसान) करण्याचा प्रयन्त केलात तर मुख्यमंत्र्यांच्या भावाचं नाव #राज_ठाकरे आहे हे लक्षात ठेवा,
ते विनंती नाही करत थेट जाळ काढतात . ??महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने पहायचे नाही@AUThackeray@AjitPawarSpeaks pic.twitter.com/T0a6uWbIRj— Rupalipatilthombare (@Rupalipatiltho1) April 15, 2020
राज्यावर कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असताना राजकीय आरोप- प्रत्यारोप देखील गेल्या दोन- तीन दिवसांपासून सुरु आहे. या सर्व प्रकरावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी संकटाच्या काळात राजकारण करु नका असं आवाहन देखील केलं होतं.