Rain in Maharashtra : पुढच्या काही तासांत जोरदार पावसाची शक्यता; ‘या’ जिल्ह्यांना इशारा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२७ जून । दोन दिवसांपूर्वी हवामान खात्याकडून (IMD) राज्यात पुढील पाच दिवस पाऊस होणार, असा इशारा देण्यात आला होता. (Rain in Maharashtra) त्यानंतर राज्यातील काही भागात पाऊस झाला. यानंतर आता हवामान खात्याकडून आणखी एक महत्त्वाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

हवामान खात्याने काय म्हटले –

हवामान खात्याने म्हटले आहे की, रत्नागिरी, सिंधुदुर्गात आता पुढील 3, 4 तास मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. (Ratnagiri Sidhudurg Heavy Rain) दुपारी 2.45 च्या उपग्रह निरीक्षणातून असे दिसून येत असल्याचे विभागाकडून सांगण्यात येत आहे. हवामान खात्याचे के. एस. होसाळीकर यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली.

तसेच हवामान खात्याने पुढे म्हटले की, रायगड जिल्ह्यालाही याचा फटका बसण्याची दाट शक्यता आहे आहे. तर मुंबई ठाण्यात अंशतः ढगाळ आकाश आहे. घाट भागातही पावसाच्या काही तीव्र सरींसाठी अनुकूल दिसत आहे, असे विभागाने म्हटले आहे.

दरम्यान, दक्षिण कोकणमध्ये मुसळधार पाऊस तर उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होईल, असे हवामान खात्याकडून सांगण्यात आले होते. तर उर्वरित राज्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे इथल्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला होता.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *