महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.३० जून । इंग्लंड क्रिकेट बोर्डाने (ECB) एजबॅस्टन कसोटीसाठी संघाची घोषणा केली आहे. इंग्लंडने भारताविरुद्धची (IND vs ENG) सीरीज वाचवण्यासाठी पाच नव्या खेळाडूंना संधी दिली आहे. हे पाचही खेळाडू याच सीरीजच्या मागच्या चार सामन्यांमध्ये इंग्लंड संघाचा भाग नव्हते. यजमानांनी जवळपास आपला संघच बदलला आहे.
‘हे’ आहेत ते पाच खेळाडू
मागच्यावर्षी ऑगस्ट महिन्यात भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर गेला होता. त्यावेळी पाच पैकी चार सामने खेळले गेले. कोविडमुळे अखेरचा कसोटी सामना रद्द झाला होता. जॅक लीच, पॉट्स, सॅम बिलिंग्स, बेन स्टोक्स, एलेक्स लीस हे खेळाडू त्या सीरीजचा भाग नव्हते. या सगळ्यांना अखेरच्या निर्णायक कसोटीसाठी संघात स्थान देण्यात आलं आहे.
भारत कधी करणार प्लेइंग 11 ची घोषणा
न्यूझीलंड विरुद्ध अखेरच्या कसोटी सामन्यात जो संघ मैदानावर उतरला होता, त्यात फक्त एक बदल करण्यात आला आहे. जॅमी ओवर्टनच्या जागी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनचचा संघात समावेश झाला आहे. भारताने अजूनपर्यंत एकमेव कसोटी सामन्यासाठी संघाची प्लेइंग इलेवनची घोषणा केलेली नाही.