महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१ जुलै । राज्यात स्थापन झालेले नवीन सरकार म्हणजे एक प्रासंगिक करार आहे. याची माहिती भाजपाला देखील आहे. हे सरकार पुढे किती काळ टिकणार आणि 2024 च्या निवणुकांमध्ये ते पुन्हा निवडून येतील की नाही. हे देखील भाजपला चांगलेच ठाऊक आहे. त्यामुळे हे सरकार फार काळ टिकणार नाही, असे भाकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी वर्तविले आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर जयंत पाटील शुक्रवारी माध्यमांशी बोलत होते.
यावेळी ते म्हणाले की 2024 च्या आधीच राज्यात मध्यावधी निवडणूका घ्याव्या लागतील. मात्र त्यावेळी हे निवडून येतील की नाही याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चांगल्याप्रकारे आहे. त्यामुळे बंडखोर गटावर किती काळ अवलंबून राहायचं हे भाजप लवकरच ठरवेल.