विधानसभेतही डायलॉगबाजी, ‘काय झाडी, काय डोंगार ओक्के; 50 खोके पक्के’; Video

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.३ जुलै । शिंदेगटाच्या बंडखोर 50 आमदारांचे शनिवारी रात्री मुंबईत आगमन झाले. त्यानंतर, महाराष्ट्राच्या विधिमंडळात आज विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. यात भाजपचे राहुल नार्वेकर यांची विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. प्रस्तावाच्या बाजूने 164 तर प्रस्तावाच्या विरोधात 107 जणांनी मतदान केले. दरम्यान, या निवडीनंतर सभागृहात आणि सभागृहाबाहेरही चांगलीच जुगलबंदी पाहायला मिळाली. बंडखोर आमदारांपैकी एक असलेल्या सांगोल्याच्या शहाजी बापू पाटील यांचा एक डायलॉग तुफान गाजला होता. त्यानंतर, या डायलॉगची आता विधानसभेतही चर्चा होताना दिसत आहे. काँग्रेस आमदाराने हा डॉयलॉग म्हणत बंडखोर आमदारांवर टिका केली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *