महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – बीड – विशेष प्रतिनिधी ! आकाश शेळके। सद्या कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात लागू असलेल्या लॉकडाउन परिस्थितीतमुळे जनजीवन विस्कळीत झालेले आहे. उद्योगधंदे बंद असल्याकारणाने अनेकांच्या संसाराचा गाडा चालण्यास प्रचंड अडचणी येत आहेत. त्यामुळे अश्या बिकट परिस्थितीमध्ये समाजभावनेतून आज #शिवछत्र परिवाराच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस मा.अमरसिंह पंडित यांच्या माध्यमातून गेवराई शहरातील 5 हाजार कुटुंबांना आवश्यक किराणा सामानाचे वाटप करण्यात आले.
लोकांच्या अडचणीत आपण खंबीरपणे त्यांच्या सोबत असायला पाहिजे असं आदरणीय दादा नेहमी सांगतात. याच प्रेरणेतून ही मदत करत असताना मिळालेले समाधान शब्दात न मांडता येणारे आहे.
#घरी_रहा_सुरक्षीत_रहा
#stay_home_stay_safe