राज्यात पुन्हा दमदार पाऊस परतणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३१ जुलै । मुंबईसह राज्यभरात ठिकठिकाणी पावसाने उघडीप घेतली आहे. हवामानात झालेले बदल पुढेही कायम राहणार असून, ३१ जुलैपासून ४ ऑगस्टपर्यंत मध्य महाराष्ट्रातील १० व मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांत अशा एकूण १८ जिल्ह्यांत पावसाची अधिक उघडीपीची शक्यता आहे.

मुंबईसह कोकणातील ४, विदर्भातील १० जिल्ह्यांत व दक्षिण महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड जिल्ह्यात तशीच परिस्थिती आहे. तसेच, ५ ते १५ ऑगस्टपर्यंत माॅन्सून पुन्हा ऊर्जितावस्थेत येऊन महाराष्ट्रात पुन्हा चांगला पाऊस पडण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली.

२८ जिल्हे व ३०९ गावे अतिवृष्टीमुळे प्रभावित

८३ सरकारकडून तात्पुरती निवारा केंद्र तयार
१४४८० नागरिक सुरक्षितस्थळी

११२
नागरिकांनी अतिवृष्टीमुळे जीव गमावला

४४
घरांचे पूर्णत: तर
२ हजार ८६ घरांचे अंशत: नुकसान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *