Maharashtra Rain Update : पुढच्या 48 तासात या ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २० ऑगस्ट । राज्यात मागच्या चार दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने सूर्यदर्शन झाले. दरम्यान राज्यात काही जिल्ह्यात पुन्हा पावसाची शक्यता आहे. भंडारा, गोंदिया चंद्रपूर गडचिरोली व नागपूर या पाच जिल्ह्याला आज हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचे प्रशासनाने सांगितले. सोबतच मध्य प्रदेश मधील काही जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला त्यामुळे विदर्भातील काही नद्यांना महापूर येऊ शकतो अशी देखील भीती हवामान विभागाकडून व्यक्त केली गेली आहे.

दरम्यान मुंबईत जुलै आणि ऑगस्टमध्ये आतापर्यंत सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने, यावर्षी शहरातील मोसमी पावसाने आधीच 2,000-मिमीचा टप्पा ओलांडला आहे. चार महिन्यांच्या हंगामाला अजून दीड महिना बाकी असल्याने मुंबईत हंगामी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या 24 ते 48 तासांत मुंबई शहर आणि उपनगरात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. IMD ने उत्तर कोकण, दक्षिण कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यासाठी येलो अलर्ट दिला आहे. तसेच घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. विदर्भासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तसेच विजांच्या गडगडाटासह वादळी आणि मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *