Gold Bond | स्वस्तात सोने खरेदीची पुन्हा संधी ; प्रति ग्रॅमचा भाव माहिती आहे का?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २१ ऑगस्ट । सरकारने पुन्हा सोने खरेदीची सुवर्ण संधी गुंतवणूकदारांना उपलब्ध करुन दिली आहे. सोन्याच्या किंमतीत (Gold Rate) सातत्याने चढ उतार होत असते. आता तर भारतातच बुलियन एक्स्चेंजची (Billion Exchange) सुरुवात झाली आहे. त्यामुळे सोने आयात करणे सोप्पं झालं आहे. त्याचबरोबर देशभरात काश्मिरपासून कन्याकुमारीपर्यंत आता सोन्याचा एकच भाव (One Nation One Rate) राहण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे सोन्यात गुंतवणूक करणे हे फायदेशीर ठरणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) सार्वभौम सुवर्ण रोखे योजना (Sovereign gold bond scheme 2022-23)आणली आहे. गोल्ड बाँडच्या विक्रीचा हा दुसरा टप्पा आहे. या योजनेची दुसरी मालिका 22 ऑगस्टपासून सुरू होत आहे. 26 ऑगस्टपर्यंत ही सोने खरेदी करता येणार आहे. रिझर्व्ह बँकेने या वर्षी 20 जून ते 24 जून दरम्यान पहिली मालिका सुरू केली होती.

सार्वभौम सुवर्ण रोखे योजनेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी सरकारने सोन्याचा दर निश्चित केला असून त्याची घोषणा केली आहे. त्यानुसार, सोन्याची किंमत 5,197 रुपये प्रति ग्रॅम जाहीर करण्यात आली आहे. गुंतवणूकदार अगदी एक ग्रॅम सोने खरेदी करुन या योजनेत सहभागी होऊ शकतो.

सरकारने नोव्हेंबर 2015 मध्ये सार्वभौम गोल्ड बाँड योजना सुरू केली होती. हे रोखे केवळ निवासी व्यक्ती, हिंदू अविभक्त कुटुंबे, ट्रस्ट् आणि धर्मादाय संस्थांना विक्री केले जाते. डिजिटल माध्यमातून गोल्ड बाँडसाठी अर्ज करणार्‍या आणि पैसे भरणार्‍या गुंतवणूकदारांना इश्यू किंमतीवर 50 रुपये प्रति ग्रॅम सूट दिली जाईल. म्हणजेच 10 ग्रॅम खरेदी केल्यास 500 रुपयांचा त्वरीत फायदा होईल. गुंतवणूकदारांना सहामाही आधारावर निश्चित किंमतीवर वार्षिक 2.5 टक्के व्याज दिले जाईल.

सार्वभौम सुवर्ण रोखे योजनेअंतर्गत, सरकार गुंतवणूकदारांना प्रत्यक्ष सोने हातात देत नाही. परंतु सोन्यात गुंतवणूक करण्याची संधी देते. या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे गुंतवणूकदार एका आर्थिक वर्षात 1 ग्रॅम ते 4 किलोपर्यंतचे सोने खरेदी करू शकतो. तर संस्थांना कमाल 20 किलो सोन्यात गुंतवणूक करता येते. या गुंतवणुकीवरील परतावा ही चांगला मिळतो. गेल्या एका वर्षात सोन्याने गुंतवणूकदारांना 7.37 टक्के नफा दिला आहे. बाँडचा एकूण कालावधी 8 वर्षांचा आहे. गुंतवणूकदारांची इच्छा असल्यास, ते 5 व्या वर्षानंतर बाँडमधून बाहेर पडू शकतात.

चोरीची भीती नाही
चोरट्यांना हे सोने चोरता येते नाही. कारण ते बॉंड स्वरुपात असते. गुंतवणूकदाराला सोने प्रत्यक्षरित्या साठवण्याची किंवा ठेवण्याची गरज नसते. याशिवाय, गुंतवणूकदाराला या योजनेतंर्गत बॉंड परिपक्तेवर सोन्याचा सध्याचा जो बाजार भाव सुरु असेल त्यानुसार परतावा मिळतो.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *