शैक्षणिक वर्षात शाळांना कोणतीही फी वाढ करता येणार नाही, सरकारने घेतला निर्णय ; पालकांना मोठा दिलासा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४- ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – मुंबई – राज्य सरकारने लॉकडाऊनमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या नागरिकांच्या हिताचा आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. चालू शैक्षणिक वर्षात शाळांना कोणतीही फी वाढ करता येणार नाही, याबाबत शिक्षण विभागाने अध्यादेश काढला आहे. शालेय शिक्षण विभागाने हा निर्णय घेऊन विद्यार्थी आणि पालकांना मोठा दिलासा दिला आहे.

शाळांनी वार्षिक फी भरण्यासाठी विद्यार्थी पालकांना सक्ती करू नये. त्याऐवजी मासिक किंवा त्रैमासिक फी भरण्याचा पर्याय पालकांना देण्यात यावा, असेही निर्देश देण्यात आले आहेत. फी वाढीबाबत पालकांनी तक्रारी केल्या होत्या, त्यानंतर शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणू या आजारास जागतिक महामारी घोषित केलं आहे. या आजाराच्या संसर्गाचा प्रतिबंध व नियंत्रण करण्यासाठी राज्यात साथरोग अधिनियम 1897 व आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 ची अमंलबजावणी सुरु आहे. त्याचबरोबर राज्यात लॉकडाऊन सुरु आहे. अशी परिस्थिती सुरु असताना शैक्षणिक संस्था, शाळांनी विद्यार्थी आणि पालकांना फीस भरण्याची सक्ती करता येणार नाही. काही शाळा पालकांना फी भरण्यास सक्ती करत असल्याच्या तक्रारी शिक्षण विभागाकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार सर्व व्यवस्थापनच्या शाळांना विद्यार्थी आणि पालकांकडून शाळेची चालू शैक्षणिक वर्षाची आणि आगामी वर्षाची फी जमा करण्याबाबत सक्ती करु नये, असे निर्देश देण्या आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *