महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ९ डिसेंबर । उत्पादक शेतकरी (Onion Farmers) अडचणीत सापडला आहे. कारण कांद्याच्या दरात घसरण झाली आहे. आधीच अवकाळी पाऊस,अतिवृष्टी यामुळं पिकांना फटका बसला आहे. कापूस (Cotton), सोयाबीन (Soybean), कांदा (Onion) या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. पावसाच्या तडाख्यातून वाचलेल्या उरल्या सुरल्या पिकांनांही योग्य दर मिळत नसल्यानं शेतकरी चिंतेत आहेत. राज्यात कांद्याचे दर झपाट्यानं घसरत आहेत. त्यामुळं शेतकऱ्यांनी कांद्याचा स्टॉक करायला सुरुवात केली आहे.
महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक कांद्याचं उत्पादन घेतलं जातं. या पिकाकडे नगदी पीक म्हणून पाहिलं जातं. राज्यातील बहुतांश लोक त्याच्या लागवडीवर अवलंबून आहेत. शेतकर्यांच्या कांद्याला साधारणत: 30 ते 40 रुपये प्रतिकिलोचा भाव मिळतो, म्हणजेच एक क्विंटल कांदा 3000 ते 4000 रुपये दरानं विकला जात असतो. मात्र यंदा कांद्याचे दर खूप कमी झाले आहेत. सध्या कांद्याला प्रतिकिलोसाठी 10 ते 15 रुपयांचा दर मिळत आहे.
देशात स्रावत जास्त कांद्याचे उत्पादन महाराष्ट्रात होते. येथूनच इतर राज्यांना कांद्याचा पुरवठा केला जातो. मात्र, यंदा महाराष्ट्रात कांद्याचे दर घसरले आहेत. कांद्याला रास्त भाव मिळत नसल्यानं शेतकरी नाराज आहेत. कांद्यासाठी शेतकरी व्यापाऱ्यांशी सौदेबाजी करत आहेत. असे असतानाही कांद्याला अपेक्षित दर मिळत नसल्यानं शेतकरी चिंतेत आहेत. दर कमी झाल्यानं शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे.
कांद्याच्या दरात घसरण झाल्यानं शेतकऱ्यांनी कांद्याची साठवणूक सुरु केली आहे. शेतकरी कांदा कोल्ड स्टोरेजमध्ये साठवून ठेवत आहेत किंवा सुरक्षित ठिकाणी ठेवत आहेत. लवकरात लवकर कांद्याचा तुटवडा बाजारात येईल, अशी आशा शेतकऱ्यांना आहे. लोकांनी कांद्याला मागणी केल्यास कांदा चांगल्या भावाने विकायला सुरुवात होईल अशी आशा शेतकऱ्यांना आहे.