उद्धव ठाकरे पक्षप्रमुख राहणार की नाही? घटनातज्ज्ञ उल्हाट बापट यांनी सांगितलं ….

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ३० जानेवारी । 23 जानेवारीला उद्धव ठाकरे यांचा शिवसेना पक्षप्रमुख या पदावर कार्यकाळ संपला आहे. त्याकरिता उद्धव ठाकरे यांच्यासह प्रमुख नेत्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पक्षप्रमुख पदाची निवडणूक घेण्यासाठीची मागणी केली होती, निवडणूक शक्य नसल्यास उद्धव ठाकरे यांनाच पक्षप्रमुख पदावर कायम करण्याची मागणी करण्यात आली होती. ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांनी याबाबत पत्रकार परिषदेत नवी दिल्ली येथे पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली होती. त्यानुसार उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुख पदाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अशातच घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी महत्वाचे विधान केले आहे. प्रत्यक्ष कायदा निवडणूक आयोगात याबाबत नाही मात्र उल्हास बापट यांनी राज्यपाल पदाबाबतचा संदर्भ देऊन पक्षप्रमुखपदाबाबत स्पष्टच सांगितलं आहे.

घटनातज्ज्ञ उल्हास बापट म्हणाले, केंद्रीय निवडणूक आयोगात प्रत्यक्ष तसा कायदा नाही, परंतु सर्वधारण कायद्यानुसार राज्यपाल हे पाच वर्षासाठी असतात, मात्र त्यांचा कालावधी संपला तरी नवीन राज्यपाल येईपर्यंत ते पदावर असतात.

राज्यपाल यांच्या निवडीप्रमाणेच उद्धव ठाकरे यांच्याबाबत होऊ शकतं, नवीन कोणाची निवड झाली नाही तर उद्धव ठाकरे हेच पक्षप्रमुख पदावर राहतील असे चित्र आहे, असं देखील उल्हास बापट यांनी म्हंटलं आहे.

एकूणच उद्धव ठाकरे यांच्यासाठी घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी जसे सांगितले तसे घडल्यास उद्धव ठाकरे यांच्या दृष्टीने महत्वाचे ठरणार आहे. त्यामुळे येत्या काळात धनुष्यबाण चिन्हा बरोबरच पक्षप्रमुख पदाचा मुद्दाही महत्वाचा ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *