महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – मुंबई – विशेष प्रतिनिधी – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार राज्यापाल भगतसिंग कोश्यारी यांच्या भेटीनंतर मातोश्रीवर दाखल झालेत. काल संध्याकाळी मातोश्रीवर शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्याच बैठक झाल्याची माहिती पुढे येत आहे. राज्यातील कोरोनाची भीषण स्थितीचे कारण पुढे करत केंद्र सरकारने काही पाऊल उचलल्यास त्यासंदर्भात रणनिती आखण्याविषयी बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे.
दरम्यान, राज्यपाल कोश्यारी आणि राज्य सरकारमधील वाद अनेकवेळा उघड झाला आहे. तसेच राज्यपाल समांतर सत्ता चालवत असल्याचाही आरोपही करण्यात आला आहे. तसेच ते प्रशासकीय अधिकाऱ्यांना काही सूचनाही करत आहेत. दोन दिवसांपूर्वी कोरोनाचा आढवा घेण्यासाठी बैठकही बोलावली होती आहे.
मा. शरद पवार व मुख्यमंत्री ऊदधव ठाकरे यांची काल संध्याकाळी मातोश्रीवर भेट झाली. दोन नेत्यात दिड तास चर्चा झाली. कुणी सरकारच्या स्थिरते बाबत बातम्यांचा धुरळा ऊडवीत असतील तर ती निव्वळ पोटदुखी समजावी. सरकार मजबूत आहे. चिंता नसावी.
जय महाराष्ट्र !!@PawarSpeaks @CMOMaharashtra— Sanjay Raut (@rautsanjay61) May 26, 2020