लॉकडाऊन 5.0 : मुंबई, पुण्यासह या 13 शहरांमध्ये कायम राहू शकतात निर्बंध ?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – आकाश शेळके – बीड : कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी देशभरात करण्यात आलेला लॉकडाऊन 4.0 उद्या समाप्त होणार आहे. पुढील लॉकडाऊनचा टप्पा कसा असेल याबाबत अद्याप सरकारकडून कोणत्याही प्रकारची माहिती देण्यात आलेली नाही. मात्र केंद्र सरकार नवीन गाईडलाईन्सवर काम करत असून, 1 जूननंतर देशातील अधिकांश भागातील लॉकडाऊनचे निर्बंध समाप्त होण्याची शक्यता आहे. 13 शहरांना सोडून इतर भागातील निर्बंध हटवण्यात येतील. .

31 मे रोजी सरकारकडून पुढील 15 दिवसांसाठी गाईडलाईन्स लागू केली जाऊ शकते. दिल्ली, मुंबई, चैन्नई, अहमदाबाद, ठाणे, पुणे, हैदराबाद, कोलकाता, इंदुर, जयपूर, जोधपूर, चेंगलपट्टु आणि तिरुवलुर या 13 शहरांमध्ये लॉकडाऊनचे निर्बंध कायम राहू शकतात. तसेच हॉटेल्स टप्प्या टप्प्याने उघडण्याची शक्यता आहे. पंतप्रधान मोदी 31 मे रोजी आपल्या मन की बात कार्यक्रमात लॉकडाऊनचा पुढील टप्पा कसा असेल याची माहिती देण्याची शक्यता आहे. मात्र यावर अंतिम निर्णय बाकी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *