काळजी घ्या ! महाराष्ट्रासह तेरा राज्यांना मलेरिया, डेंग्यूचा अलर्ट

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २५ एप्रिल । यंदा तापमानात सारखे चढ-उतार होत आहेत. कधी गारपीट तर कधी कडक उन्हाचा चटका सुरू आहे. या वातावरणामुळे मलेरियाचे जंतू व डेंग्यूचे विषाणू सक्रिय झाले असून, महाराष्ट्रासह तेरापेक्षा जास्त राज्यांचा सावधानतेचा इशारा हवामान विभागाच्या आरोग्य वार्ता विभागाने दिला आहे.

हवामानातील बदल आपल्या आरोग्यवर तत्काळ परिणाम करतात. आजवर हे अलर्ट वैद्यकीय विभाग देत होता; मात्र आता हवामान शास्त्र विभाग देत आहे. भारतीय हवामान विभागाने ही सेवा सुरू केली असून यंदाचा पहिला मलेरियाचा अलर्ट नुकताचा दिला आहे. जम्मू-काश्मिरपासून तामिळनाडू राज्यासाठी हे अलर्ट देण्यात आले आहे.

हे दोन विषाणू सक्रिय…
हवामान विभागाने राज्यांची यादीच जाहीर केली आहे. यात जेथे कमाल तापमान 33 ते 39 अंश व किमान तापमान 16 ते 19 अंश आहे तेथे प्लास्मोडियम फॅल्सिफोरम व प्लास्मोडियम व्हायव्हॅक्स हे दोन विषाणू सक्रिय होण्याचा धोका असल्याचा अलर्ट दिला आहे.

या राज्यांना अलर्ट…
25 ते 27 एप्रिल : या कालावधीत महाराष्ट्र, राजस्थान, गोवा, पंजाब, त्रिपुरा, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, आसाम, मध्य प्रदेश, गुजराथ
28 एप्रिल ते 4 मे : या कालावधीत महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश, बिहार, मिझोराम, त्रिपुरा, झारखंड, गोवा, तेलंगणा, आंध्र प्रदेश, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *