प्रशासनाचे त्या शिक्षकांना आदेश ; ३१ मेपर्यंत शाळेत रुजू व्हा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २७ एप्रिल । प्राथमिक शिक्षकांच्या नवीन धोरणानुसार बदली झालेल्या शिक्षकांना येत्या १५ मेनंतर जुन्या शाळा सोडण्यास सांगण्यात आले आहे. त्यानंतर नवीन शाळेवर रुजू होण्यासाठी सर्व शिक्षकांना ३१ मेची अंतिम मुदत देण्यात आली आहे. यामुळे यंदा झालेल्या शिक्षकांच्या बदल्या रद्द होणार नसल्याचे स्पष्ट आहे. परिणामी बदल्यांबाबतचा संभ्रम आता दूर झाला आहे.

कोरोना महासाथ, शिक्षकांच्या बदल्यांच्या धोरणांची अंमलबजावणी आणि या बदल्यांसाठी नव्याने विकसित केलेली संगणकीय प्रणाली यामुळे गेल्या तीन वर्षांपासून प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत आणि आंतरजिल्हा बदल्या झाल्या नव्हत्या. बदल्यांबाबतच्या नव्या धोरणानुसार यंदा पहिल्यांदाच जिल्हांतर्गत बदल्यांची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. नव्या धोरणानुसार एकाच शाळेत किमान पाच वर्षे काम केलेल्या शिक्षकांना या बदली प्रक्रियेत सामावून घेण्यात आले होते. तत्कालीन ग्रामविकास मंत्र्यांनी शिक्षकांच्या बदल्यांचे नवे धोरण २७ फेब्रुवारी २०१७ रोजी आणले होते. या धोरणानुसार राज्यस्तरावरून ऑनलाइन पद्धतीने बदली प्रक्रिया राबविण्यात आली होती. या निर्णयाला शेकडो शिक्षकांनी न्यायालयात आव्हान दिले होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *