महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१० मे । सुप्रीम कोर्टामध्ये सध्या सत्तासंघर्षाच्या निकालाचं वाचन सुरू आहे. यावेळी सुप्रीम कोर्टाकडून एकनाथ शिंदेंना मोठा धक्का देण्यात आला आहे. भरत गोगावले यांची मुख्य प्रतोतपदी केलेली नियुक्ती बेकायदेशीर असल्याचं सुप्रीम कोर्टानं म्हटलं आहे. याचबरोबर आम्हीच खरी शिवसेना असा दावा कोणीही करू शकत नाही असंही यावेळी कोर्टाने म्हटलं आहे. हा एकनाथ शिंदेंसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल पुन्हा लांबणीवर पडला आहे. नबाम राबिया प्रकरण या खटल्यात लागू होत नाही, असं नमूद करत या खटल्याबाबतचा निर्णय आता विधानसभा अध्यक्षांकडे सोपवण्यात आला आहे. त्यामुळे जरी सुप्रीम कोर्टाने मुख्यमंत्री शिंदेंवर ताशेरे ओढले असले तरी देखील शिंदेंनाच मोठा दिलासा मिळाला आहे. आता या प्रकरणाचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर घेणार आहेत.