महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २४ मे । मे महिन्यात तापमान सर्वत्र वाढले. राज्यातील अनेक जिल्ह्याच्या तापमानाने ४० अंशांचा वर पारा गाठला आहे. अनेक ठिकाणी कुठे हिट व्हेवचा ईशारा दिला आहे. यामुळे मान्सून कधी येणार? याची वाट पाहिली जात आहे. यासंदर्भात सकारात्मक बातमी आली आहे. राज्यात मान्सून कधी येणार? याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे. शेतकऱ्यांनी शेतीच्या कामाला जोमाने लागावे, अशी ही बातमी आहे.
कधी येणार मान्सून
अरबी समुद्रात बाष्पयुक्त वारे तयार होण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे राज्यात लवकरच मान्सूनचे संकेत मिळाले आहे. कोकणात 27 मे ला मान्सूनपूर्व पावसाचे संकेत हवामान विभागाने दिले आहे. सध्या सुरु असलेली उष्णतेच्या लाटेपासून अजून दिलासा नाही. उर्वरित महाराष्ट्रात उष्णतेची लाट कायम राहणार आहे. परंतु लवकरच मान्सून आगमन होणार असल्याची चाहुल लागली आहे. यामुळे राज्यात वेळेवर सात जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे.
स्कायमेटचा काय आहे अंदाज
स्कायमेटच्या अंदाजानुसार केरळमध्ये मान्सून 7 जूनपर्यंत पोहोचणार आहे. विषुववृत्तीय अक्षांशांमध्ये दक्षिण हिंद महासागरावर चक्रीवादळ सरकत आहे. हे वादळ कमी होण्यास जवळपास एक आठवडा लागेल. हे वादळ मान्सूनला रोखणारे आहे. परंतु सध्या मान्सून अंदमान निकोबारकडे वेगाने वाटचाल करत आहे. यामुळे भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, मान्सूनची प्रगती अशीच राहिल्या केरळमध्ये १ जूनपर्यंत दाखल होऊ शकतो.