Weather Update : राज्यात आजही अतिमुसळधार, 6 जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २९ जुन । हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज राज्यातील सहा जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे. सातारा, पुणे, नाशिक, पालघर, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यांमध्ये आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे . मुंबई, कोल्हापूर, सिंधुदूर्ग, जळगाव आणि नंदुरबारमध्येही मुसळधार पावसाची शक्यता आहे . या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.


बुधवारीही राज्याच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली. देशातील बहुतांश राज्यांमध्ये मान्सूनने हजेरी लावली आहे.राजधानी दिल्ली आणि आसपासच्या परिसरात 3-4 दिवसांपासून अधूनमधून पाऊस पडत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *