अजित पवारांकडून जनतेला योग्य न्याय मिळेल; सत्तेच्या साठमारीत सर्वसामान्यांची परवड होऊ नये – ठाकरे

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १९ जुलै । बंगरुळूत देशप्रेमी पक्षाची एक बैठक झाली. आमची लढाई ही कुणा एका व्यक्तीविरोधात किंवा पक्षाविरोधात नसून आमची लढाईही हुकुमशाहीविरोधात आहे. कारण पक्ष येत असतात, नेते येत असताता जात असतात, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले आहे. तर पंतप्रधान, मुख्यमंत्री ही पदे येतात आणि जातात असेही त्यांनी म्हटले आहे.


दरम्यान उद्धव ठाकरे पुढे बओलताना म्हणाले की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हातात राज्याच्या आर्थिक चाव्या आल्या आहेत. त्यांच्या कामाची पद्धत माहिती असल्याने जनतेना योग्य न्याय मिळेल असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे. त्यांनी विधीमंडळात ठाकरे गटाच्या आमदारांची बैठक घेतल्यानंतर ते माध्यमांशी संवाद साधत होते.

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा

उद्धव ठाकरे म्हणाले की, अजित पवारांनी राज्यासाठी चांगले काम करावे, कारण सत्तेसाठी साठमारी सध्या राज्यात सुरू आहे. राज्यातील प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न असो असे सर्व विषयावर मी अजित पवार यांच्याशी चर्चा केली. अजित पवारांनी अडीच वर्षे माझ्यासोबत काम केले असून त्यांचा स्वभाग आणि काम करण्याची पद्धत मला माहिती असल्याने मी खात्रीने सांगतो ते जनतेसाठी काम करतील. कारण राज्याच्या तिजारीच्या चाव्या त्यांना देण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्रातील जनता हुशार

उद्धव ठाकरे म्हणाले की, अजित पवार फंड देत नाही म्हणून भाजपसोबत जाणारा शिंदे गट आज अजित पवारांसोबत काम करत आहे. महाराष्ट्रातील जनता हुशार आहे, त्यांना माहिती आहे यांनी पक्ष सोडत भाजपला साथ का दिली असे त्यांनी म्हटले आहे. आपला धृतराष्ट्र नाही तर शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे हे त्यांनी लक्षात ठेवायला हवे, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

असे व्हिडिओ बघत नाही

उद्धव ठाकरे म्हणाले की, किरीट सोमय्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणी राज्यभरातील महिलांनी आपली संतप्त भूमिका मांडली आहे. त्यामुळे आता सरकारने कारवाई करावी. तसेच, उद्धव ठाकरे यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही भेट घेतली. या भेटीबद्दल उद्धव ठाकरे म्हणाले, अजित पवार व आम्ही पूर्वी एकत्र काम केले आहे. त्यांच्याकडे पुन्हा आता तिजोरीच्या चाव्या गेल्या आहेत. ते जनतेला मदत करतील अशी अपेक्षा आहे. विरोधी गोटात असूनही अजितदादांबद्ल उद्धव ठाकरे यांनी काढलेल्या या वक्तव्याचे आता राजकीय अर्थ काढले जात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *