महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.५ ऑगस्ट । हवामान विभागानं (IMD) दिलेल्या अंदाजानुसार आजही राज्यातील काही भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.राज्यात पावसाचा (Rain) जोर कमी झाला आहे. तुरळक ठिकाणी पावसानं हजेरी लावली आहे.राज्यातील कोकणासह विदर्भातील काही जिल्ह्यात चांगला पाऊस झाला आहे. मात्र, अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
मागील चार ते पाच दिवसापासून राज्यात पावसानं दडी मारल्याचं चित्र दिसत आहे.हवामान विभागानं (IMD) दिलेल्या अंदाजानुसार आजही राज्यातील काही भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.हवामान विभागानं राज्यात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला असला तरीही राज्यात सध्या पावसानं दडी मारल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
आज कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट, रायगडसह पुणे आणि सातारा जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे राज्यात काही भागातच पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणी पावसाची गरज आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.