Heat Wave: पुढील सात दिवस उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा, पारा ४७ अंशावर पोहोचणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २० मे ।। गेल्या महिन्याभरापासून जळगाव जिल्ह्यात कडाक्याचे उन्ह कायम असून अजून आठवडाभर तरी जिल्हावासियांना कडाक्याच्या उन्हापासून दिलासा मिळण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे आगामी सात दिवस उष्णतेची लाट असल्यामुळे तापमान ४७ अंशापर्यंत जाणार आहे.

मे महिना सर्वाधिक उष्ण ठरत आहे. गेल्या महिन्याभरापासून जिल्ह्यात कडाक्याचे ऊन कायम असून अजून आठवडाभर ते जिल्हावासीयांना कडाक्याच्या उन्हापासून दिलासा मिळण्याची शक्यता कमीच आहे. त्यातच आगामी आठवडाभर जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. येत्या चार दिवसात पारा ४७ अंशापर्यंत जाण्याचा अंदाज देखील वर्तविण्यात आला आहे.

शनिवारी जळगाव शहर व जिल्ह्यात पारा ४२ अंशावर कायम होता. दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यात हवामान विभागाकडून वादळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र ठराविक भागांमध्ये पावसाने हजेरी लावली तर पारा मात्र ४२ अंशाच्या पुढेच राहिला होता. त्यातच १५ ते १८ किलोमीटर वेगाने वारे वाहत असल्याने उष्णझळा अधिकच जाणवत आहेत.

रात्री बारा वाजेपर्यंत उष्णझळा जाणवत आहेत त्यातच वातावरणात ६० टक्क्यांपेक्षा आद्रतेचे प्रमाण असल्याने असह्य उकाडा देखील जाणवत आहे. दोन महिन्यांपासून उष्ण वातावरणामुळे हैराण झालेल्या जळगावकरांना आता पावसाची प्रतीक्षा लागली आहे.
पावसामुळे वीज खंडित, ग्रामस्थांकडून झुगाड; चार्जिंगच्या बॅटरी आणि मोबाईल टॉर्चच्या उजेडात मतदान

कारण काय आहे?

राजस्थान व गुजरातकडून उष्ण वारे सक्रिय झाले आहेत. त्यातच हे वारे जमिनीपासून फार काही जास्त उंचीवर नाही, त्यामुळे उष्णतेची दहाकता अधिक जाणवत आहे. एकीकडे तामिळनाडूसह दक्षिण भारत व ओडिशाच्या भागात कमी दाबाचे क्षेत्र विकसित झाले आहे, त्यामुळे जळगाव जिल्ह्यात उष्ण वाऱ्यांमुळे तापमानाचा अधिक जाणवत असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *