Manoj Jarange Patil: ‘एकत्र राहा, सरकार आपल्यात फूट पाडेल…’ नाशिकच्या सभेतून जरांगे पाटलांचे आवाहन

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ९ ऑक्टोबर | मराठा आरक्षणासाचा लढा उभारलेले मनोज जारांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे सध्या राज्याच्या दौऱ्यावर आहेत. रविवारी (८, सप्टेंबर) त्यांची नाशिकमध्ये जाहीर सभा झाली. यावेळी त्यांनी आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात आली असून महाराष्ट्रातील मराठ्यांचा विजय होईल… असा विश्वास यावेळी व्यक्त केला.

काय म्हणाले जरांगे पाटील?
“मराठा आरक्षणाची लढाई अनेक वर्षांपासून सुरू आहे. 29 ऑगस्ट ला पण लढाई सुरू झाली. शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू असताना आमच्यावर प्राणघातक हल्ला केला. आमचं असं काय चुकलं होतं? असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी (Manoj Jarange Patil) यावेळी उपस्थित केला.

तसेच “काहींचे हात मोडले, पाय मोडले, एका मुलीच्या पायात गोळी घुसली होती. एका मुलाच्या तर छातीत 35 गोळ्या शिरल्या होत्या. असे सांगत हा आमच्यावर नव्हे तर संपूर्ण मराठा समाजावर झालेला हल्ला होता. असे ते यावेळी म्हणाले.

आता आरक्षण मिळवायचे, आलेल्या संधीचे सोन करा. ही शक्ती अशीच राहुद्या, कसे आरक्षण देत नाही पाहुया, इथं विजय माझा नाही महाराष्ट्रातील मराठ्यांचा विजय होईल असा विश्वास व्यक्त करत आपल्यात फूट पडू देऊ नका, सरकार आपल्यात फूट पाडेल.. अशी भितीही त्यांनी यावेळी बोलून दाखवली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *