अति दमट वातावरणात रक्तातील साखरेची पातळी वाढते का? मधुमेहींनी कोणती काळजी घ्यावी? जाणून घ्या

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १७ऑगस्ट ।। मधुमेहग्रस्तांना आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. वातावरणातील अति दमटपणामुळे अनेकदा रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवणे कठीण जाते. उष्णता आणि हवेतील ओलावा यांमुळे जी आर्द्रता निर्माण होते, त्याचा थेट परिणाम आपल्या रक्तातील साखरेच्या पातळीवर होतो. ज्या लोकांना मधुमेह आहे, त्यांनी ही बाब समजून घेणे गरजेचे आहे की, दमटपणा त्यांच्या शरीरातील ग्लुकोजच्या पातळीवर कसा परिणाम करतो.

अति दमटपणा रक्तातील साखरेच्या पातळीवर कशा प्रकारे परिणाम करतो. विशेषत: मधुमेहींच्या आरोग्यावर त्याचा कसा परिणाम होतो? याबाबतची माहिती दिल्ली येथील सी. के. बिर्ला हॉस्पिटलच्या इंटर्नल मेडिसिनच्या संचालिका डॉ. मनीषा अरोरा यांनी दिली आहे.

अति दमटपणामुळे तणाव वाढतो आणि त्यामुळे शरीरात कॉर्टिसोल हार्मोनची पातळी वाढते. कॉर्टिसोल हा ‘स्ट्रेस हार्मोन’ आहे; ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढते. कॉर्टिसोल हार्मोनमुळे मधुमेही रुग्णाच्या रक्तातील साखरेची पातळी कमी होते; ज्याला हायपोग्लायसेमिया म्हणतात.

अति दमटपणामुळे शारीरिक थकवा जाणवतो आणि त्यामुळे तुम्हाला शरीराची हालचाल करण्याची इच्छा होत नाही आणि एका जागी बसून राहावेसे वाटते. कमी शारीरिक हालचालींमुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. हे अजूनही सिद्ध झालेले नाही; पण काही पुरावे सांगतात की, दमट वातावरणामुळे शरीरात पाण्याची कमतरता जाणवते. त्यामुळे डिहायड्रेनशची समस्या निर्माण होते. जेव्हा शरीरातील पेशींना रक्तातील ग्लुकोज शोषून घेण्यास अडचण जाणवते तेव्हा शरीराला आणखी इन्सुलिनची आवश्यकता भासते.

दमट वातावरणात मधुमेहाच्या रुग्णांनी कोणती काळजी घ्यावी?
आरोग्यतज्ज्ञाचा नियमित सल्ला आवश्यक : दमटपणामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवणे खूप कठीण जाते. पण, रक्तातील साखरेच्या पातळीविषयी आपल्या आरोग्यतज्ज्ञाला नियमित माहिती देणे आणि त्याविषयी आवश्यक सल्ला घेणे गरजेचे आहे.

संतुलित आहार : चांगला संतुलित आहार ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. संतुलित आहार हा आपली रक्ताची पातळी स्थिर ठेवण्यास मदत करतो. विशेषत: जेव्हा वातावरणात बदल जाणवतो, तेव्हा पोषक आहार फायदेशीर ठरतो.

भरपूर पाणी पिण्याची गरज : भरपूर पाणी पिणे खूप जास्त गरजेचे आहे. त्यामुळे डिहायड्रेशनसारखी समस्या दूर होते आणि रक्तातील साखर नियंत्रणात ठेवता येऊन, रक्तातील ग्लुकोज शोषून घेणे पेशींना सोपे जाते.

निवासस्थळी थंडावा महत्त्वाचा : दमट वातावरणात थंड ठिकाणी राहा. एसी, कूलर किंवा पंख्याचा वापर करा. त्यामुळे तणाव कमी होतो. त्याचबरोबर खूप जास्त एसीचा वापर करू नका. काही ठराविक कालवधीनंतर ब्रेक घ्या.

तणाव कमी करण्यासाठी योगधारणा : तणाव कमी करण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी योगा, ध्यान किंवा दीर्घ श्वास घेणे इत्यादी व्यायाम करा. त्यामुळे शरीरातील कॉर्टिसोल हार्मोनची पातळी कमी होईल आणि तुम्हाला तणाव जाणवणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *