महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – नांदेड – दि. २४ ऑगस्ट -‘काँग्रेस पक्षाला एकजीव ठेवण्याची, बांधून ठेवण्याची क्षमता केवळ गांधी कुटुंबाकडे आहे. इतिहासातही हे अनेकदा सिद्ध झाले आहे. या वास्तवाची जाणिव ठेवूनच पक्षाची पुढील वाटचाल झाली पाहिजे,’ असं सांगतानाच, ‘सक्षम, संयमी व संवेदनशील नेते असलेल्या राहुल गांधी यांनीच पक्षाचे नेतृत्व करावे,’ अशी आग्रही मागणी काँग्रेस नेते व सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे.
दिल्लीत आज काँग्रेस कार्यसमितीची महत्त्वाची बैठक होत आहे. या बैठकीत पक्षाचा पुढील अध्यक्ष कोण यावर चर्चा होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्याराज्यातील नेते आपापली मते व्यक्त करत आहेत. हायकमांडचे विश्वासू नेते अशी ओळख असलेले अशोक चव्हाण यांनी राहुल गांधी यांच्या नावाला अध्यक्षपदासाठी पसंती दिली आहे.
— Ashok Chavan (@AshokChavanINC) August 23, 2020