15 जुलैपासून यूपीआयसाठी नवा नियम, ट्रान्झॅक्शन फेल होताच मिळणार रिफंड

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २५ जून ।। देशभरात डिजिटल पेमेंट अर्थात यूपीआयवरून पैशांची देवाणघेवाण करणाऱया ग्राहकांची संख्या आता कोटींच्या घरात आहे. यूपीआय वापरणाऱया युजर्सला चांगली सेवा मिळावी यासाठी नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने येत्या 15 जुलै 2025 पासून एक नवीन नियम आणायचे ठरवले आहे. हा नियम लागू झाल्यानंतर ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. ट्रान्झॅक्शन करताना युजर्सच्या खात्यातून पेमेंट गेले आहे, परंतु ते ज्याला पाठवले आहे त्यापर्यंत पोहोचले नाही, तर युजर्सला तत्काळ रिफंड आता मिळू शकणार आहे. तसेच चुकीच्या यूपीआय नंबरवर पैसे पाठवल्यानंतरसुद्धा युजर आपल्या बँकेकडून पैशांची मागणी करू शकणार आहे. याआधी यूपीआय पेमेंट 30 सेपंदांत केले जात होते, परंतु आता ते केवळ 10 ते 15 सेपंदांत केले जात आहे.

प्रक्रिया अधिक वेगवान अन् सोपी
सध्याच्या सिस्टिमनुसार, जर एखाद्या बँकेने यूपीआय चार्जबॅक विनंती नाकारली तर एनपीसीआय सिस्टम आपोआप पुढील प्रक्रिया थांबवते. एनपीसीआयला हस्तलिखित याचिका पुन्हा करावी लागते. ही प्रक्रिया हळू आणि फारच गुंतागुंतीची होती. त्यामुळे ग्राहकांना रिफंड मिळण्यासाठी बराच वेळ वाट पाहावी लागत होती, परंतु आता नव्या चार्जबॅक सिस्टिममुळे ही प्रक्रिया वेगवान आणि सोपी होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *