![]()
महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २३ जुलै ।। राज्यात मागील दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (23 जुलै) अतिमुसळधार पाऊस कोसळत असून रेड अलर्ट जारी करण्यात तर विदर्भातही अतिमुसळधार पाऊस कोसळत असल्याने अलर्ट जारी करण्यात आला आहे.
पुणे, सातारा आणि कोल्हापूर घाटमाथ्याव जिल्हांतील घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर पुणे शहरासह कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. तर जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड येथे विजांचा कडकडाट, वादळी वारे आणि पावसाची शक्यता असल्याने येले अलर्ट जारी करण्यात आला आहे.
नाशिक जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे तसेच धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज आहे. आहिल्यानगर आणि जळगावमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
