महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. २ ऑक्टोबर | भारतात सर्वाधिक भ्रष्टाचार होत आहे. भ्रष्टाचार रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार दोन्ही प्रयत्न करत आहेत. परंतु अनेक ठिकाणी तरीही अजून भ्रष्टाचार सुरु आहे. दरम्यान, सध्याच्या आकडेवारीवरुन असं दिसून येतंय की, भ्रष्टाचार कमी होण्याऐवजी अजूनच वाढत आहे. दरम्यान,आता पुन्हादेखील देशात सर्वाधिक भ्रष्टाचार हा महाराष्ट्रात होत आहे. (Most Corrupt State In India)
२०२३ मध्येही सर्वाधिक भ्रष्टाचार हा महाराष्ट्रात झाला होता. असं केंद्र सरकारच्या एनसीआरबी रिपोर्टनुसार समोर आले आहे.२०२३ मध्ये देशभरात ११३९ भ्रष्टाचाराची प्रकरणे उघडकीस आली आहे.त्यातील सर्वाधिक म्हणजे ७६३ प्रकरणे ही भारतात झाल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे देशातील सर्वाधिक भ्रष्टाचार हा महाराष्ट्रात झाला आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र आहे. यानंतर हरियाणा,आसाम आणि जम्मू काश्मीरचा नंबर लागतो.
दरम्यान, महाराष्ट्रातदेखील सर्वात जास्त भ्रष्टाचार हा पुण्यात झाला आहे. पुण्यात भ्रष्टाचाराची २८ प्रकरणे उघडकीस आली आहेत. सर्वाधिक भ्रष्टाचार करणारं शहर म्हणजे पुणे. याआधी देशात कोईम्बतूर, चेन्नईत सर्वाधिक भ्रष्टाचारी प्रकरणे उघडकीस आली. यानंतर नागपूर आणि मुंबईतदेखील भ्रष्टाचार झाला आहे.
देशात सर्वाधिक आत्महत्या या महाराष्ट्रात झाल्या आहेत. २०२३ मध्ये देशात तब्बल १,७१,४१८ लोकांनी आत्महत्या केल्या आहेत. यातील सर्वाधिक आत्महत्या या महाराष्ट्रात झाल्या आहेत. २०२२ च्या तुलनेत हा आकडा ०.३ टक्क्यांनी वाढला आहे.