महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – प्रतिनिधी – दि. २३ ऑक्टो – कोरोना महामारी हे राष्ट्रीय तथा जागतिक संकट आहे म्हणून ह्या संकटातून जनतेला वाचविण्यासाठी व हि महामारी मुळापासून नष्ट करण्यासाठी सरकारने कोरोना प्रतिबंधक लस देशातील प्रत्येक नागरिकाला मोफत देणे आवश्यक आहे. परंतु भारतीय अर्थमंत्री माननीय निर्मला सितारामन यांनी बिहार निवडणुकीत भा.ज.प पक्षाला निवडून दिले तर कोरोना ची लस मोफत दिली जाईल अशी घोषणा पटणा येथे केली आहे.
निवडणुक आयोगाच्या दृष्टीने ही घोषणा म्हणजे आचारसंहितेचा भंग होऊ शकतो की नाही ही बाब तपासून ते त्या नुसार कारवाई करतीलही , परंतु ज्या राज्यात सध्या निवडणुका नाहीत तेथे कोरोना ची लस मोफत मिळणार नाही तर ती विकत घ्यावी लागेल असा याचा अर्थ आहे का? वास्तविक पाहता कोरोना लस ही देशातील संपुर्ण जनतेला मोफत उपलब्ध करुन दिली पाहिजे. तसे न करता निवडणुकीत मोफत लसीचे अमीष दाखवून मत मिळवने मानवते च्या दृष्टीने योग्य नसून माणसा माणसा मध्ये भेद निर्माण करणारी आहे…………पि.के.महाजन.