“महिला शिक्षक दिनाच्या” निर्णया प्रमाणेच “भिडे वाडयाचे” राष्ट्रीय स्मारक करावे …..पि.के.महाजन.

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी -पि.के.महाजन.- दि. ४ जानेवारी – महाविकास आघाडी सरकारने ज्ञान ज्योती सावित्रीमाई फुलें चे कार्य लक्षात घेवून 3 जानेवारी हा सावित्रीमाई फुलेंचा जन्म दिवस “महीला शिक्षक दिन” म्हणून जाहीर केला आहे…… 1 जानेवारी 1848 रोजी सावित्रीमाई फुलें नी पुणे येथील भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली.शिक्षणामुळे माणसाची प्रगती झाली. मात्र ज्या वास्तूतून शिक्षणाची सुरुवात झाली तिची भयंकर दुर्दशा झाली. पहिल्या शाळेच्या वास्तूची…(पुणे येथील भिडे वाड्याची) दुर्दशा पाहीली तर तळपायाची आग मस्तकात जाते. चारही बाजूंनी पडलेल्या भिंती, मोडलेल छप्पर इत्यादी .सदर मोडलेल्या वास्तूकडे सत्ताधारी तसेच सामाजिक संघटनांना किंवा कोणालाच त्याची खंत नाही……सदर वास्तू समोरच श्रीमंत दगडू हलवाई गणपती चे जागृत देवस्थान आहे. देशातील लाखो लोक त्या ठिकाणी दर्शनाला येत असतात.ज्या मध्ये सत्ताधारी व मोठ मोठे करोडपती व अब्जपती ही असतील परंतु एकाच ही ती कडे चूकून ही लक्ष जात नसेल का ?

…..सत्ताधारी कारभारी नेते मंडळी सर्वच अशी आहे कि जि आजही थोर क्रांतिकारकांच्या नावाचा वापर फक्त निवडणुकी पुरता करतात, मोठमोठी भाषणं ठोकतात, पाठांतर करून थोर क्रांतिकारकांच्या कार्याचा गौरव करतात. गुणगान गातात. एकदाची निवडणुक संपली की सर्व निर्लज्जंम सदा सुखी…तो मी नव्हेच असा आव आणून मजेत जगतात…………एकालाही शरम वाटत नाही की ज्या शाळे मुळे आपले पूर्वज शिकले नंतर आपण शिकलो सवरलो मोठे झालो. ज्या वास्तू मुळे आपल्या ज्ञानात भर पडली , ज्या मुळे आपल्याला खरे आणि खोटे याच्यातील फरक कळायला सुरुवात झाली व जीवनाचा सुखी मार्ग सापडला त्या वास्तू च्या उपकाराची परत फेड म्हणून का होईनाजेणेकरून येणारया पिढी पुढे आदर्श निर्माण होईल..

म्हणून का होईना त्या वास्तूचे (भिडे वाड्याचे) “राष्ट्रीय स्मारक” करावे अशी अपेक्षा आहे जनतेची . एक वर्ग असा आहे की ज्याला कळकळीने वाटते की सदर वास्तूचे पुनर्जीवन करून राष्ट्रीय स्मारक व्हावे…ते दरवर्षी मोर्चा काढतात, ओरडून ओरडून मागणी करतात की सरकारने त्या वास्तू चे राष्ट्रीय स्मारक करावे….परंतु मायबाप सरकारला त्याचे काहीच देणे घेणे नाही. महीला शिक्षक दिनाचा निर्णय प्रमाणेच पहील्या शाळेच्या वास्तूचे पुनर्जीवन करून ” राष्ट्रीय स्मारक ” घोषीत करण्याचा निर्णय सरकार लवकरच घेईल अशी अपेक्षा बाळगू या……….

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *