पिंपरी चिंचवडमध्ये संचारबंदीचा पहिलाच दिवस , नियमांचं उल्लंघन करणाऱ्या नागरिकांना पोलिसांच्या लाठीचा प्रसाद

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.२३। पिंपरी चिंचवड । काल रात्री (सोमवार) या संचारबंदीचा पहिलाच दिवस होता. त्यानुसार पोलिसांनी प्रत्येक चौकात नाकाबंदी केली असून पोलीस अ‌ॅक्शन मोडमध्ये दिसत आहेत. संचारबंदीचंं उल्लंघण करणाऱ्या नागरिकांवर पोलिसांनी दंडुके उगारात अनेकांना पहिल्याच दिवशी लाठीचा प्रसाद दिल्याचं पाहायला मिळालं. शहरांत ठिकठिकाणी पोलिसांनी नाकाबंदी केली होती. रात्री घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांची पोलिस चौकशी करत होते.दिवसेंदिवस वाढती कोरोना रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री अजित पवार आणि जिल्हा प्रशासनाने शहरात रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतलाय. त्यानुसार नियमांचं उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत.

(Pimpari Chinchwad Night Curfew Police Action Against Who Break the Rule)

पालकमंत्री अजित पवार आणि जिल्हा प्रशासनाने संचारबंदीची घोषणा केल्यानंतर काल रात्री संचारबंदीचा पहिलाच दिवस होता. अनेक नागरिक रात्री 10.30 ते 11 च्या सुमारास घराबाहेर आढळून आले. नागरिकांच्या घराबाहेर पडण्याचं कारण काय? याची पहिल्यांचा चौकशी केली. जे नागरिक कामाशिवाय घराबाहेर पडले त्यांना पोलिसांनी नियम समजावून सांगितले.काही ठिकाणी पोलिसांनी नागरिकांचं प्रबोधन केलं. तर काही ठिकाणी आगाऊ लोकांना पोलिसांनी आपल्या लाठीचा प्रसादही दिला. मास्क न वापरणाऱ्या लोकांवर पोलिसांनी कारवाई करत आर्थिक दंड वसूल केला.

कोरोनाला रोखण्यासाठी पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांसह जिल्ह्यासाठी नव्याने काही निर्णय घेण्यात आले आहेत. शाळा कॉलेज बंद– गर्दी होत असल्याने पहिल्या टप्प्यात 28 फेब्रुवारीपर्यंत शाळा कॉलेज बंद असतील. अभ्यासिका सुरु असल्या तरी सोशल डिस्टन्स पाळणं अनिवार्य राहणार आहे.
हॉटेल, बार, रेस्टॉरंट- रात्री 11 पर्यंतच खुले ठेवण्याची परवानगी आहे. वाहतूक व्यवस्था सुरु- शहरातील सर्व खासगी आणि सार्वजनिक व्यवस्था सुरु राहणार आहे. मात्र नियमांचं पालन करणं अनिवार्य असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *