ठाकरे सरकार अडचणीत ? ; संजय राऊतांचं सूचक ट्विट

Spread the love

महाराष्ट्र २४ ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. २१ – मुंबई – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir singh) यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर ठाकरे सरकार मोठ्या अडचणीत सापडले आहे. परमबीर सिंह यांचे हे पत्र प्रसारमाध्यमांच्या हाती लागल्यानंतर एकच गदारोळ झाला. त्यामुळे ठाकरे सरकार कधी नव्हे इतक्या मोठ्या संकटात सापडले आहे. या पार्श्वभूमीवर आता महाविकासआघाडीचे शिल्पकार आणि शिवसेनेचे संकटमोचक असलेल्या संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सूचक संदेश ट्विट केला आहे. (Shivsena leader Sanjay Raut tweet after Parambir singh letter bomb)

संजय राऊत यांनी रविवारी आपल्या जावेद अख्तर यांचा एक शेर ट्विट केला. राजकीय वर्तुळात या ट्विटची चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे. संजय राऊत यांना या माध्यमातून नेमका काय संदेश द्यायचा आहे, यावरुन तर्कवितर्क लढवले जात आहेत.

2019मध्ये विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात रंगलेल्या सत्तानाट्यावेळीही संजय राऊत अशाचप्रकारे दररोज सूचक शेरोशायरी करताना दिसले होते. त्यामुळे आताही ठाकरे सरकार काही अनपेक्षित चाल खेळणार का, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

केंद्र सरकारने KGB किंवा CIA आणली तरी फरक पडत नाही: संजय राऊत
परमबीर सिंह यांचे पत्र समोर आल्यानंतर शनिवारी संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलायला स्पष्ट नकार दिला होता. मला या विषयासंदर्भात काही माहिती नाही. हा सरकारसंदर्भातील विषय आहेत. त्यामुळे सरकारमधील लोकच यावर बोलतील, असे संजय राऊत यांनी म्हटले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *