नांदेड ; अत्यावश्यक कामाशिवाय कोणीही घरा बाहेर निघू नये- तहसीलदार दताञय शिंदे

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड । दि.१६ एप्रिल । जिल्यातील आज रोजी धर्माबाद शहरात नवीन लॉकडाऊन संदर्भात प्राप्त झालेल्या सुचनांसदर्भात तहसीलदार व नगरपरिषद मुख्याधिकारी दताञय शिंदे साहेब यांच्यासह बैठक घेऊन त्यानंतर संपुर्ण शहरात फिरून सदर सूचनांप्रमाणे अत्यावधक वस्तू व सेवा या व्यतीरिक्त कुठल्याही आस्थापना उघडणार नाहीत व महत्वाच्या कामाशिवाय कोणीही घरा बाहेर पडणार नाही अश्या व इतर सर्व सूचना पी. ए.सिस्टिमद्वारे देण्यात आल्या आहेत कार्यवाहीसाठी संयुक्त पथके निर्माण करून कारवाई करण्यास सुरुवात केली .

सदर अधिकार्यांनी धर्माबाद शहरात पथसंचलन करुन जनजागृती करण्यात आली आहे. यावेळी धर्माबादचे तहसीलदार दताञय शिंदे, पोलिस ठान्याचे पोलिस निरीक्षक सोहन माछरे, सहपोलिस निरीक्षक गणेश कराड, सहायक पोलिस ऊपनिरीक्षक साहेबराव नल्लेवाड, गोपनिय शाखेचे संतोष आनेराव, वाहतुक पोलिस कर्मचारी माधव पाटील खतंगावकर, सुर्यवंशी, सुभाष मुंगल व नगरपालिकेतील व ठान्यातील कर्मचारी आदि उपस्तिथ होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *