महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । पुणे । दि. ९ मे । आचार्य चाणक्य एक महान कुटनीतीज्ज्ञ होते. राजनीती तज्ज्ञ होते. त्यांनी प्रत्येक क्षेत्राचा अभ्यास केला होता. त्यांना नीतीशास्त्र आणि अर्थशास्त्राचे जनकही म्हटलं जातं. चाणक्य यांनी त्यांच्या याच धोरणाच्या बळावर एका साधारण मुलाला सम्राट बनवलं. आपल्या जीवनाचे अनुभव त्यांनी चाणक्य नीतीच्या माध्यमातून सांगितले.
गुरुमंत्र
# आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर वेळेची किंमत करा, असं आचार्य चाणक्य सांगायचे. आजच्या प्रत्येक क्षणाचा सदुपयोग करा. नाही तर भविष्यात संकटाचा सामना करावा लागेल, असं चाणक्य सांगतात.
# तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर तुमच्या जीभेवर तुमचा ताबा हवा. तुमची वाणी मधुर हवी. जे लोक घाणेरड्या भाषेचा उपयोग करतात ते लवकरच बरबाद होतात, असं चाणक्य सांगतात.
# चुकीच्या सवई आणि चुकीची संगत नेहमीच आयुष्य बरबाद करते. ] चुकीची संगती तात्काळ सोडा.
# मूर्ख व्यक्तीचा उपदेश ऐकावा लागल्याने ज्ञानी व्यक्तीही दु:खी होत असतो. ]त्यामुळे अशा लोकांपासून दूर राहावे, असं चाणक्य म्हणतात.