महाराष्ट्र २४ मुंबई : राज्यातील महिला अत्याचारांच्या घटनांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी गुन्हेगारांवर तातडीने कडक कारवाई करावी, असे स्पष्ट आदेश गृहविभागाला दिले आहेत. महिलांवरील अत्याचार सुसंस्कृत महाराष्ट्रात सहन केले जाणार नाहीत, असे सांगतानाच मुख्यमंत्री ठाकरे यांनी कडक शब्दात इशारा दिला आहे. आरोपीला उचला, फटकवा, काहीही करा, असे मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना आदेश दिले आहेत.
हिंगणघाटमधील घटनेवर राज्यात संतापाची लाट असताना औरंगाबादच्या सिल्लोडमध्ये एका महिलेला जाळल्याचा प्रकार समोर आला. त्यात हिंगणघाटच्या तरुणीची प्रकृती स्थीर असली तरी चिंता कायम आहे. दरम्यान, महिलांवरचे अत्याचार सुसंस्कृत महाराष्ट्रात खपवून घेणार नाही, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. तशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी पोलीस प्रमुखांना दिल्यायत. महिलांवरचे अत्याचार रोखण्यासाठी आंध्र प्रदेश, तेलंगणासारखा कायदा करता येईल का, याचा विचार सुरू असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितले.