महाराष्ट्र २४ , नाशिक – आपली कला सादर करून काेणी शृंगार उतरवत हाेते तर काेणी तान्हुल्याला छातीशी घेतलं हाेतं, काेणी कपडे बदलत हाेतं तर काेणी झाेपण्याच्या तयारीत असतानाच ५-६ मद्यधुंद गावगुंड राहुटीत शिरले आणि कलावंतिणींचा हात ओढत , जबरदस्ती करत आत्ताच आमच्यापुढं नाचा असा धिंगाणा घालत थेट त्यांच्या कपड्यांना हात घातला. फडातील बाप्ये साेडायला गेल्यावर त्यांनाच जबर मारहाण केली. त्यात आणखी ५-६ गुंड सामील झाले आणि मग महिलांचे कपडे आेढण्यापासून ते बाप्यांना लाठीकाठी व शस्त्राने जबर मारहाण या गावगुंडांनी केली. त्यात दाेघे गंभीर जखमी झाले. ही लज्जास्पद घटना घडली ती आदर्श ग्रामपंचायत म्हणून बिरुद मिरवणाऱ्या नाशिकच्या साकूर गावात. वाडीवऱ्हे पाेलिसांत गावातील गणेश व वैभव यांच्यासह टाेळक्याविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अचानक हल्ला करून केला विनयभंग
आम्ही मेकअप उतरवत हाेताे, कपडे बदलत हाेताे, ते गुंड अचानक आले अन् थेट राहुटीत घुसले. आमच्यापुढे आत्ताच नाचा, आत्ताच नाचा असं अर्वाच्य भाषेत ते बाेलत हाेते. नकार दिल्यावर त्यांनी आम्हाला जबरदस्तीने बाहेर आेढलं, कपडे आेढले. विराेध केल्यावर त्यांचा माेर्चा इतर पाेरींकडे गेला. त्यांचाही या मवाल्यांनी नकाे तिथे हात लावत विनयभंग केला. अख्खा फड जाळून टाकू अशी धमकी दिली. अजूनही सगळेचजण भीतीच्या सावटाखाली आहेत. त्यांना पाेलिसांनी तत्काळ ताब्यात घेऊन कडक शिक्षा करावी हीच आमची मागणी आहे. – फिर्यादी पीडिता
हा लाेककलेवर हल्ला
आम्ही महिलांना साेडवायला गेलाे असता त्यांनी मग माझ्यासह आमच्याच माणसांना जबर मारहाण केली. काठ्यांनी, फायटरने मारामारी केली. हे गावातीलच चांगल्या घरातील लाेकं आहेत. गावातील अनेकजण त्यांची नावं सांगायलाही घाबरत आहेत. त्यांचं म्हणणं आहे की, मिटवून घ्या. पण, हा अत्याचार आम्ही का सहन करायचा. ब्लेडने कपडे फाडले, पाेलिसांत तक्रार केली तर तमाशा जाळून टाकू अशी धमकी दिली. हा आमच्यावर नाही तर हा लाेककलेवर हल्ला झाला आहे. त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. – आविष्कार मुळे, तमाशा मालक