मला माझं हिंदुत्व सिद्ध करण्याची गरज नाही ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Spread the love

महाराष्ट्र २४,मुंबई : दुसरीकडे मनसेच्या मोर्च्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टीका केली आहे. आपल्याला हिंदुत्व सिद्ध करण्याची गरज नाही. शिवसेनेनं कधीही झेंड्याचा रंग बदलला नाही अशी टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. मरेपर्यंत भगवा सोडणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं. कारण ते बाळासाहेबांचे हिंदुत्व आहे. ते शुद्ध आहे.शिवसेना आमदारांची आज सह्याद्री अतिथीगृहावर बैठक पार पडली. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. या बैठकीत सीएए आणि एनआरसीबाबत शिवसेना आमदारांना मार्गदर्शन करण्यात आलं.

या बैठकीत सीएए आणि एनआरसी संदर्भात सर्व आमदारांना करण्यात मार्गदर्शन आलं. सीएए आणि एनआरसी म्हणजे नेमकं काय आहे हे समजावून सांगितलं. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, काही लोकं म्हणत आहेत की, शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि कॉंग्रेस सोबत गेल्यानं आम्ही हिंदुत्व सोडलंय, पण हिंदुत्व आणि भगवा मरेपर्यंत सोडणार नाही, असं ठाकरे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *