आता मोबाइल बिलात होणार वाढ

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३० जुलै । भारतातील मोबाइलधारकांच्या बिलामध्ये येणाऱया महिन्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मोबाइल फोनच्या नियमीत बिलामध्ये अंदाजे 30 टक्क्यापर्यंत वाढ होऊ शकते, अशी शक्यता सांगितली जात आहे. दरम्यान ही वाढ टप्याटप्याने येत्या 6 महिन्यात केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. भारती एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया यांनी यासाठी प्रयत्न सुरू केले असल्याचे समजते. भारती एअरटेलने याआधीचा 49 रुपयांचा प्लान बंद करून तो वाढवून आता 79 रुपये इतका केला असल्याचे समजते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *