महाराष्ट्र 24 – नवी दिल्ली
गेल्या महिन्यात प्रदर्शित झालेल्या ‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’ या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावरच नव्हे तर बॉक्स ऑफिवरदेखील चांगलेच राज्य गाजवले आहे. प्रदर्शित होऊन एक महिना उलटला असला तरी तान्हाची चित्रपटाचा फिव्हर अजूनही उतरला नसल्याचे पाहायला मिळत आहे. देशभरातील कमाईचे आकडे पाहता हा चित्रपट लवकरच आणखी विक्रम आपल्या नावावर करण्याची शक्यता आहे. ‘तान्हाजी’ने देशभरात आतापर्यत २७५ कोटींची कमाई केली आहे.
महाराष्ट्रात या चित्रपटानं सर्वाधिक गल्ला जमवला असून ‘बाहुबली-२’ चित्रपटानंतर सर्वात जास्त कमाई करणारा ‘तान्हाजी’ हा चित्रपट ठरला आहे. अशी माहिती बॉक्स ऑफिस इंडिया रिपोर्टने दिली आहे.भारताबाहेर देखील चित्रपटाच्या कमाईचे आकडे वाढत असून विदेशात सर्वांत जास्त कमाई केलेल्या चित्रपटाच्या यादीत आता ‘तान्हाजी’चा समावेश होणार आहे. या चित्रपटाने जवळपास ३७ कोटीच्या अंतराने अमिर खानच्या ‘दंगल’ चित्रपटालादेखील मागे पछाडले आहे. महाराष्ट्रात तान्हाजी या चित्रपटाने सलमान खान, रणवीर सिंग आणि दूसरे दिग्गज स्टार्सच्या चित्रपटाला मागे टाकले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा वीर सुभेदार तान्हाजी मालुसरे यांच्या जीवनावर हा चित्रपट आधारित आहे. अभिनेता अजय देवगण, काजोल, सैफ अली खान, शरद केळकर यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. दिग्दर्शक ओम राऊत याच्या दिग्दर्शनाखाली बनलेला हा चित्रपट आहे.
सर्वाधिक गल्ला जमवला जमवणारे चित्रपट
बाहुबली 2- 1,85,76,00,000
तान्हाजी: द अनसंग वॉरियर- करीब 1,41,00,00,000
दंगल- 1,04,26,00,000
पीके- 1,04,21,50,000
टाइगर जिंदा है- 1,04,40,00,000
संजू- 1,01,86,00,000
बजरंगी भाईजान- 90,77,00,000
सिम्बा- 89,33,00,000
कबीर सिंह- 87,21,50,000
गोलमाल अगेन- 87,08,50,000
सुल्तान – 86,30,50,000
उरी: द सर्जिकल स्ट्राइक- 84,11,00,000
3 इडियट्स- 79,19,00,000
हाउसफुल 4- 79,03,50,000
पद्मावत- 78,86,00,000
वॉर- 77,42,50,000
धूम 3- 76,42,50,000
प्रेम रतन धन पायो- 70,79,00,000
चेन्नै एक्सप्रेस- 68,48,00,000
बाजीराव मस्तानी- 67,43,00,000