महाराष्ट्र – 24 – मुंबई :
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून राज्यातील राष्ट्रीय महामार्गांची सुरू असलेल्या कामांची स्थिती अत्यंत वाईट झाली आहे. मागील दीड वर्षात ही परिस्थिती उद्भवली असून रस्त्यांना पुरेसा निधी मिळत नसल्याने ही कामे रखडली आहेत. हे लक्षात घेता सध्या सुरू असलेली कामे पूर्ण झाल्यानंतरच नवीन कामांना परवानगी दिली जाईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी दिली. तसेच यासाठी 5 मार्च रोजी केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
पुरवणी मागण्यांवरील चर्चेवेळी बोलताना अशोक चव्हाण म्हणाले, राज्यातील अनेक रस्त्यांची स्थिती ही खराब आहे ही वस्तुस्थिती आहे. ती सुधारायची असेल तर राज्याच्या सर्वच भागांतील प्रमुख रस्त्यांचे ग्रीड करून ते दुरुस्त करावे लागतील. एशियन डेक्हलपमेंट बँकेच्या माध्यमातून त्यासाठी कर्जउभारणी करण्यात येईल, अशी घोषणा सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी किधानसभेत केली.
टोल बंद केल्याने पर्यायी मार्गाने पैसे उभारावे लागतील
टोल बंद करण्यात आल्याने तिजोरीवर भार आला आहे. त्याचसोबत कॉण्ट्रक्टरांचीही अडचण झाली आहे. सर्वांची बैठक घेऊन हा प्रश्न सोडवावा लागेल. टोल बंद झाल्याने आलेला आर्थिक भार दूर करण्यासाठी अन्य मार्गाने पैसे उभारावे लागतील, असेही अशोक चव्हाण म्हणाले.