या क्रिकेटरची IPL कारकीर्द संपली! आता टीम इंडियामध्ये संधी मिळणेही कठीण?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १४ ऑक्टोबर । आयपीएल 2021च्या (IPL 2021 दुसऱ्या क्वालिफायरमध्ये (Qualifier 2), दिल्ली कॅपिटल्सला (Delhi Capitals) कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या रोमांचक सामन्यात तीन विकेट्सने पराभव पत्करावा लागला आहे. त्यानंतर एका चांगल्या खेळाडूचे करिअरही संपुष्टात आल्याचे जमा आहे. टीम इंडियात (Team India) स्थान मिळण्याचे संकट कायम आहे. या पराभवासह, आयपीएल 2021 मधील दिल्ली कॅपिटल्सचा प्रवास संपला. यासह, ऋषभ पंत (Rishabh Pant) याचा संघ पुन्हा एकदा ट्रॉफी जिंकण्यापासून वंचित राहिला. या पराभवाची जबाबदारी संघाच्या स्टार सलामीवीरावर येऊ शकते.

पुढील वर्षी आयपीएलच्या मेगा लिलावापूर्वी शिखर धवनला (Shikhar Dhawan) दिल्ली कॅपिटल्समध्ये कायम ठेवण्यात येणार नाही, अशी शक्यता आहे, दिल्ली फ्रँचायझी त्याला पुन्हा खरेदी करणार नाही, असेच दिसून येत आहे. शिखर धवनने (Shikhar Dhawan) आयपीएल 2021 मध्ये 16 सामने खेळले आहेत आणि 39.13 च्या सरासरीने 587 धावा केल्या आहेत आणि 124.62 च्या स्ट्राईक रेटने. हा आकडा दिसायला खूप मोठा वाटतो, पण लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे ‘गब्बर’ने पहिल्या फेजमध्ये यापैकी सर्वाधिक धावा केल्या.

शिखर धवनने दुसऱ्या फेजमध्ये चांगली कामगिरी केलेली नाही. दिल्ली कॅपिटल्सला पॉइंट टेबलच्या वरच्या स्थानावर नेण्यात महत्वाची भूमिका बजावली, पण आयपीएल 2021 च्या टप्प्यात त्याची बॅट अनेकवेळा शांत राहिली.आयपीएल 2022 मेगा लिलावात शिखर धवन (Shikhar Dhawan) याला दुसर्‍या संघाने खरेदी केले जाईल की नाही हे सांगणे खूप कठीण आहे, कारण अलीकडेच तो टी -20 फॉर्मेटमध्ये चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरला आहे. असे झाल्यास ‘गब्बर’ची आयपीएल कारकीर्द संपेल.

टीम इंडियामध्ये परतणे कठीण
आयसीसी टी -20 विश्वचषक 2021 साठी शिखर धवनचा टीम इंडियामध्ये समावेश करण्यात आलेला नाही, धवन ज्याप्रकारे तो फलंदाजी करत आहे, त्यावरुन त्याच्या निवडीबाबत साशंकता आहे. त्याच्यावर भारतीय सेलेक्टर्स पुन्हा विश्वास ठेवतील का, अशी शक्यता अत्यंत कमी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *