संक्रांतीच्या तोंडावर तिळाच्या दरात तेजी कायम

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२० डिसेंबर । मागील वर्षीच्या तुलनेत यंदा देशात तिळाचे उत्पन्न साधारणतः २५ टक्क्यांनी घटणार आहे. त्यामुळे संक्रांतीच्या तोंडावर तिळाच्या दरात तेजी कायम राहणार आहे. इतर पिकांच्या तुलनेत तिळाच्या उत्पादनात एकरी उत्पन्न कमी मिळत असल्याने देशात तिळाचे उत्पन्न कमी होत आहे. परिणामी, चार महिन्यांत तिळाच्या दरात ४०-५० रुपयांनी वाढ झाली आहे.

देशात तीळ उत्पादित राज्यात अवेळी मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने उत्पादनाला मोठा फटाका बसला आहे. त्यामुळे यंदा तिळाचे उत्पन्न कमी झाले आहे. तसेच, पावसामुळे तीळ हलका आणि कमी दर्जाचा, डागी तिळाचे उत्पादन जास्त निघाले आहे. बाजारात सध्या दर्जेदार तिळाला जास्त मागणी आहे. देशात खरीप हंगामात मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू आणि ओडिशा या राज्यांत तिळाचे उत्पादन घेतले जात असल्याची माहिती मार्केट यार्डातील तिळाचे व्यापारी अजित बोरा यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *