हवामान खात्याचा अंदाज ; राज्यात पुढील दोन महिने कायम रहाणार गुलाबी थंडी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२० डिसेंबर । राज्यात मागील आठवडाभरापासून गुलाबी थंडीला सुरुवात झाली आहे. त्यातच उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे राज्यात थंडीचा जोर आणखी वाढणार आहे. राज्यातील अनेक शहरांचे तापमान 21 फेब्रुवारीपर्यंत 10 अंश सेल्सिअसपर्यंत खाली येण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील तापमानात आधीच घट झाली आहे. उत्तर महाराष्ट्रातील अनेक भागांचे तापमान तर 8 ते 9 अंशांपर्यंत खाली आले आहे. त्यामुळे शेकोट्यांचा आधार घेताना नागरिक दिसत आहेत. तर ऊबदार कपडेही कपाटाबाहेर काढून वापरात आलेत.

यंदा राज्यात अवकाळी पाऊस आणि कमी दाबाच्या पट्ट्यांमुळे गुलाबी थंडीचे जरा उशिराच आगमन झाले. पण आता ही थंडी 21 फेब्रुवारीपर्यंत राज्यभरात कायम राहणार असल्यामुळे गुलाबी थंडीचा अनुभव पुढचे दोन महिने तुम्हाआम्हाला घेता येणार आहे. त्यातच आज आणि उद्या तापमानाचा पारा आणखी घसरण्याचा अंदाज आहे. उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे राज्यातील थंडीचा जोर आणखी वाढणार आहे.

राज्यातील अनेक शहरांचे तापमान 21 फेब्रुवारीपर्यंत 10 अंश सेल्सिअसपर्यंत खाली येण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील तापमानात आधीच घट झाली आहे. उत्तर महाराष्ट्रातील अनेक भागांचे तापमान तर आताच 8 ते 9 अंशांपर्यंत खाली आल्यामुळे नागरिक शेकोट्यांचा आधार घेताना दिसत आहेत. तर ऊबदार कपडेही कपाटाबाहेर काढून वापरात आले आहेत. पुढील 48 तासात थंडीचा जोर उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे वाढणार आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील तापमानात घट झाली आहे. तर उत्तर महाराष्ट्रातील काही भागातील तापमान 8-9 अंश सेल्सिअसपर्यंत खाली जाणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *